आंजर्ले किनाऱ्यावर कासव बघण्यासाठी पर्यटकांची जत्रा Turtle Festival Anjarle
आंजर्ले किनाऱ्यावर कासव बघण्यासाठी पर्यटकांची जत्रा

रत्नागिरी जिल्ह्यातील आंजर्ले Anjarle समुद्र किनाऱ्यावर गेल्या आठवड्यापासून Turtle Festival कासव महोत्सवाला सुरुवात झाली आहे. येत्या १५ एप्रिलपर्यंत महोत्सव सुरु राहणार आहे. काही शाळांच्या वार्षिक परीक्षा संपल्यामुळे सहकुटुंब, निसर्गाबद्दल कुतूहल असलेल्या पर्यटकांनी सध्या या महोत्सवासाठी हजेरी लावली आहे.

समुद्राचा स्वच्छता कर्मचारी म्हणजे सागरी कासव. वर्षभर समुद्रातच राहणारी हा जीव सहसा किनाऱ्यावर येत नाही. फक्त तो जखमी झाला तरच किनाऱ्यावर वाहून येतो आणि सागरी कासवाची मादी दरवर्षी अंडी घालण्यासाठी किनाऱ्यावर येते. साधारपणे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून ऑलिव्ह रिडले या सागरी कासवांचा अंडी घालण्याचा म्हणजेच विणीचा हंगाम सुरु होतो.

हेही वाचा: बागेश्री आणि गुहाला लावल्या ॲंटिना

कोकण किनारपट्टीवर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गातील किनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले कासव (मादी) अंडी घालण्यासाठी येतात. पुढे दोन महिने त्यांचा हा हंगाम सुरु राहतो. या वर्षी आंजर्लेच्या किनाऱ्यावर कासवांनी अनेक घरटी केली आहेत. या वर्षीच्या हंगामातील अंड्यांतून बाहेर पडलेली पहिली बॅच काह दिवसांपूर्वीच बाहेर पडली. त्यामुळे येथील कासव संवर्धन करणाऱ्या संस्थेनी या वर्षीचा कासव महोत्सव जाहीर केला आहे.

आई बरोबर नसताना पिटुकली पिल्लं धिटाईने तुरूतुरू अथांग पसरलेल्या समुद्राच्या दिशेने एकटीच चालत जाताना बघण्याचा सोहळा काही निराळाच असतो… त्यामुळेच बहुधा कोकण किनाऱ्यावर दरवर्षी बघायला मिळणारा हा सोहळा बघण्यासाठी वेगवेगळ्या भागातील पर्यटक कासव महोत्सवात सहभागी होतात.

महोत्सव सुरू झाला कारण

गेल्या काही वर्षात सागरी कासवांची संख्या वेगाने घटली आहे, त्यामुळे त्यांचा समावेश धोकाग्रस्त प्रजातींमध्ये Endangered Species झाला आहे. कासवांना सर्वाधिक धोका असतो तो म्हणजे किनाऱ्यावर आल्यानंतर. मादी किनाऱ्यावर सुरक्षित ठिकाणी अंडी ठेवते आणि पुन्हा समुद्रात निघून जाते. कासवांच्या पिल्लांना पालकत्व मिळत नाही. जन्माला आली की ती समुद्राच्या दिशेने चालायला लागतात. त्यामुळे अंड्यातून पिल्लू बाहेर येईपर्यंत ती अधिक असुरक्षित असतात. कित्येकदा भटकी कुत्री, लांडगे, कोल्हे, शिकारी पक्षी, अनेकदा माणसही त्यांची अंडी पळवतात. समुद्रात फेकून दिलेल्या मासेमारीच्या जाळीत अडकूनही अनेक ते जखमी होतात, कधी कधी फास बसतो.

सागरी कासवांना वाचविण्यासाठी चिपळूण येथील सह्याद्री निसर्गमित्र संस्थेने वीस वर्षांपूर्वी कासव संवर्धनाला सुरूवात केली. निसर्ग अभ्यासक भाऊ काटदरे यांनी गावकऱ्यांमध्ये जागृती केली आणि कासवांना वाचविण्याच्या मोहीमेत सहभागी करुन घेतले. कासवांना वाचवल्यास त्यांना बघण्यासाठी पर्यटक येतील, त्यातून तुम्हाला रोजगार मिळेल आणि कासवांचेही संवर्धन होईल हे पटवून दिले. त्यामुळे लोकांच्या सहभागातून पहिल्या वर्षी संस्थेतर्फे पन्नास घरटी सुरक्षित केली. त्यातून दोन हजार ७३४ पिल्लांना समुद्रात सोडण्यास यश आले. पुढे अजून काही गावं यात सहभागी झाली.

हेही वाचा: कासवांसाठी लढणारे भाऊ BHAU KATDARE

वेगवेगळ्या शहरातील लोक कासव बघण्यासाठी गावात यायला सुरुवात झाली. स्थानिक लोकांच्या घरात पर्यटकांची राहण्याची आणि जेवणाची सोय झाल्यामुळे गावकऱ्यांनाही रोजगार मिळाला. आता राज्याच्या कानाकोपऱ्यातून, वेगवेगळ्या देशातील पर्यटक कासव महोत्सवात सहभागी होतात. गावकरी कासवांच्या घरट्यांची काळजी घेतात. यासाठी दरवर्षी किनाऱ्यांवर कासवमित्र नेमले जातात. कासवांच्या अंड्यांची काळजी कशी घ्यायची याचे त्यांना प्रशिक्षण दिले जाते. शास्त्रीय पद्धतीने सर्व प्रक्रिया केली जाते. महाराष्ट्रात रायगडमधील

हेही वाचा: कोकणातील दुर्मीळ कातळशिल्प RAJAPUR LATERITE SURFACE

दिवेआगर, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, मारळ, रत्नागिरीतील वेळास, केळशी, आंजर्ले, मुरूड, कर्दे, वेत्ये-तिवरे-आंबोळगड, माडबन, दाभोळ, कोळथरे, गुहागर आणि सिंधुदुर्गातील वेळागर, मोचेमाड, सागरतीर्थ, वायगंणी (वेंगुर्ला), मुणगे, तांबळडेग, शिरोडा या किनार्‍यांवर ऑलिव्ह रिडले कासव अंडी घालण्यासाठी येतात.

आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com

निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.

Leave a comment