लोकांच्या सहभागातून मानव-वन्यजीव संघर्ष सुटेल Man Elephant Conflict
देशाच्या कानाकोपऱ्यात डोके वर काढत असलेला मानव आणि वन्यप्राणी संघर्ष Man Elephant Conflict रोखण्यासाठी, व्यवस्थापनासाठी आणि वन्यजीव संवर्धनासाठी देखील एकट्या वन विभागाने काम करून उपयोग होणार नाही. या सर्व उपक्रमांमध्ये वन विभागाने स्थानिक संस्था, प्रशासन, स्वंयसेवी संस्थांना एकत्र आणून वन्यप्राणी आणि माणसांमधील संघर्ष रोखण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे आवाहन केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी केले. देशभरातील हत्तींच्या गणनेचे काम अंतिम टप्प्यावर आहे, असेही यादव यांनी सांगितले.
हेही वाचा: सांबराच्या शिंगांना मागणी मोठी पण विक्री नाही
केंद्रीय वने, पर्यावरण आणि हवामानबदल मंत्रालयातर्फे खात्याचे मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय वन्जीव मंडळाच्या स्थायी समितीची २१ वी बैठक डेहराडून येथे घेण्यात आली. प्रोजेक्ट एलिफंट हा बैठकीचा विषय होता. यावेळी इशान्येकडील राज्यांसह मध्य भारत आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये दिवसेंदिवस वाढत असलेला हत्ती आणि मनुष्य संघर्ष या विषयावर चर्चा करण्यात आली.

या बैठकीला हत्तींचे वास्तव्य असलेल्या सर्व राज्यांचे वरिष्ठ वनाअधिकारी, शास्त्रज्ञ आणि अभ्यासक, एनजीओंचे प्रतिनिधी आले होते. भारतातील हत्ती संवर्धनाच्या पुढील वाटचालीवरची दिशा या वेळी ठरविण्यात आली. यात प्रामुख्याने मानव-हत्ती संघर्षावर भर देण्यात आला. लोकांना विश्वासात घेऊन, त्यांच्या सहभागातूनच हत्तीची समस्या सुटेल, हा मुद्दा अभ्यासकांनी अधोरेखीत केला.
दरम्यान रेल्वेच्या धडकेमुळे होणाऱया हत्तीच्या मृत्यूची समस्या गंभीर झाली आहे. भारतात २०१९ ते २०२४ या वर्षांमध्ये रेल्वे अपघातामध्ये तब्बल ७३ हत्तींचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे रेल्वेच्या मार्गावर ज्या भागात हत्तींचा वावर आहे, त्यांचे कॉरिडॉर निश्चित करून त्या ठिकाणांना संवेदनशील क्षेत्र ठरविण्याचे कामावरही चर्चा करण्यात आली. अभ्यासकांनी आत्तापर्यंत रेल्वे मार्गावरील ३४५२.४ किलोमीटर अंतराचे सर्वेक्षण पूर्ण केले असून यातील ७७ ठिकाणे हत्तींच्या भ्रमणाच्या दृष्टीने जोखमीची असल्याचे या वेळी जाहीर करण्यात आले. यावर मार्ग काढण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.
Header Image Courtesy: Devendra Gogate
आपल्या परिसरातील निसर्गविषयक घडामोडी, बातम्या, लेख “निसर्गवार्ता” मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी कळवा अथवा लिहा : info@nisargaranga.com
निसर्गवार्ता च्या WhatsApp ग्रुप मध्ये आपल्याला वेळोवेळी मिळतील आमचे विविध Updates. इथे क्लिक करून निसर्गवार्ता WhatsApp Group Join करा.